चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक)
जिल्ह्याच्या प्रशासकीय इतिहासात महत्त्वाचा टप्पा गाठत वसुमना पंत यांची नव्या जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या रूपाने चंद्रपूरला पहिल्यांदाच महिला जिल्हाधिकारी लाभल्या आहेत.
वसुमना पंत या यापूर्वी नागपूर महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी आपल्या कामकाजातून सक्षम नेतृत्व, कठोर निर्णयक्षमता आणि कर्तव्यनिष्ठा यांचा ठसा उमटवला आहे. त्यामुळे त्यांच्या नियुक्तीकडे मोठ्या अपेक्षेने पाहिले जात आहे.
दरम्यान, विद्यमान जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या पुढील नियुक्तीबाबत अद्याप स्पष्टता समोर आलेली नाही. गौडा यांनी चंद्रपूर जिल्ह्यात तीन वर्षांहून अधिक काळ सेवा बजावत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले.
प्रशासनाकडून गौडा यांना वसुमना पंत यांच्याकडे कार्यभार सोपवण्याचे आदेश देण्यात आले असून, लवकरच अधिकृत पदभार स्वीकारण्याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
नव्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आगमनामुळे जिल्ह्याच्या विकासकामांना नवी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मुख्य संपादक; सतीश आकुलवार




















