Homeताज्या बातम्यामहापरिनिर्वाण दिनी संयमाचा संकल्प: 6 डिसेंबरला राज्यातील सर्व वाइन शॉप–बार बंद ठेवावे...

महापरिनिर्वाण दिनी संयमाचा संकल्प: 6 डिसेंबरला राज्यातील सर्व वाइन शॉप–बार बंद ठेवावे सोनू वाळके (लोकवाद न्युज, उपसंपादक) यांची मागणी !”

गडचिरोली : (जिल्हा प्रतिनिधी)

भारतभरातील लाखो अनुयायी, विचारवंत आणि तरुण वर्ग 6 डिसेंबरला महानायक, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन अत्यंत श्रद्धा, शिस्त आणि आदराने साजरा करतात. देशाच्या सामाजिक क्रांतीला दिशा देणाऱ्या या महापुरुषाच्या पुण्यतिथीनिमित्त संपूर्ण राज्यात वातावरण भाविकतेने भारून जाते.
या पवित्र दिवशी गालबोट लागू नये, कोणतीही अप्रिय घटना घडू नये आणि डॉ. बाबासाहेबांच्या स्मृतिदिनाचा पवित्रपणा अबाधित राहावा, यासाठी महाराष्ट्रभर एक दिवस सर्व वाइन शॉप, बार आणि मद्यविक्री केंद्र पूर्णपणे बंद ठेवावेत, अशी मागणी सामाजिक संघटना, विद्यार्थी संघ, भीम अनुयायी आणि अनेक मान्यवरांनी जोरदारपणे केली आहे.
दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक मुंबईच्या चैत्यभूमीवर दाखल होतात, राज्यातील विविध ठिकाणी महाप्रार्थना, व्याख्याने आणि संविधान वाचनाचे कार्यक्रम होतात. अशा वेळी मद्यपानामुळे होणारी गर्दी, भांडणे किंवा कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या घटना टाळण्यासाठी सरकारने सक्तीचे आदेश लागू करावेत, असा ठाम आवाज समाजातून उठू लागला आहे.
“महापरिनिर्वाण दिन हा आदराचा दिवस; मनोरंजनाचा नाही. त्या दिवशी वाइन शॉप–बार बंद ठेवले तर ते बाबासाहेबांप्रती खरी कृतज्ञता ठरेल,” असे मत विविध संघटनांनी नोंदवले आहे.
राज्य सरकारकडे येत्या काही तासांत या मागणीवर निर्णय घेण्याची जनतेत उत्सुकता वाढली आहे. भाविकांची एकच अपेक्षा —
“६ डिसेंबरला शिस्त, संयम आणि आदराची मर्यादा राखा; बाबासाहेबांच्या दिवसाला गालबोट लागू देऊ नका.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सावनेरचे नवनियुक्त उपविभागीय अधिकारी कल्याणकुमार दहाट यांचा सत्कार

0
सावनेर : मंगेश उराडे (ब्युरो चीफ) सावनेर तहसीलमध्ये नुकतीच उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या कल्याणकुमार दहाट यांचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन...

यंदाचा मे महिना 114 वर्षांतील दुसरा सर्वाधिक उष्ण; तापमानाने मोडले विक्रम

0
चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) राज्य शासनाच्या गॅझेटिअरच्या अधिकृत नोंदीप्रमाणे 16 मे 1912 रोजी राज्यातील चंद्रपूर शहराचे तापमान आजवरचे सर्वाधिक 48.3 अंश सेल्सिअस इतके...

नवनियुक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांचे मूल येथे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेकडून स्वागत

0
मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) चंद्रपूर जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी साहेब यांनी मूल येथील पोलीस स्टेशनला भेट दिली असता, डिजिटल मीडिया...

डिझेल विक्रीतील कथित अनियमिततेविरोधात INTUC चे तहसीलदारांना निवेदन

0
मुल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) शहरातील गांधी चौक परिसरातील एका पेट्रोल पंपावर डिझेल विक्रीमध्ये होत असलेल्या कथित अनियमिततेविरोधात भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (INTUC) संघटनेने...

भारतीय जनता पक्षातर्फ़े मुल शहरातील गुणवंताचा सत्कार

0
आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्तुत्य उपक्रम मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) नुकताच दहावीचा नागपूर बोर्डचा निकाल लागला असून मुल तालुक्यातील विद्यार्थ्यांनी कुठेही मागे न...

सावनेरचे नवनियुक्त उपविभागीय अधिकारी कल्याणकुमार दहाट यांचा सत्कार

0
सावनेर : मंगेश उराडे (ब्युरो चीफ) सावनेर तहसीलमध्ये नुकतीच उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या कल्याणकुमार दहाट यांचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन...

यंदाचा मे महिना 114 वर्षांतील दुसरा सर्वाधिक उष्ण; तापमानाने मोडले विक्रम

0
चंद्रपूर : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) राज्य शासनाच्या गॅझेटिअरच्या अधिकृत नोंदीप्रमाणे 16 मे 1912 रोजी राज्यातील चंद्रपूर शहराचे तापमान आजवरचे सर्वाधिक 48.3 अंश सेल्सिअस इतके...

नवनियुक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांचे मूल येथे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेकडून स्वागत

0
मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) चंद्रपूर जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी साहेब यांनी मूल येथील पोलीस स्टेशनला भेट दिली असता, डिजिटल मीडिया...

डिझेल विक्रीतील कथित अनियमिततेविरोधात INTUC चे तहसीलदारांना निवेदन

0
मुल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) शहरातील गांधी चौक परिसरातील एका पेट्रोल पंपावर डिझेल विक्रीमध्ये होत असलेल्या कथित अनियमिततेविरोधात भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (INTUC) संघटनेने...

भारतीय जनता पक्षातर्फ़े मुल शहरातील गुणवंताचा सत्कार

0
आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्तुत्य उपक्रम मूल : सतीश आकुलवार (मुख्य संपादक) नुकताच दहावीचा नागपूर बोर्डचा निकाल लागला असून मुल तालुक्यातील विद्यार्थ्यांनी कुठेही मागे न...
error: Content is protected !!